'शॉपिंग'हा स्त्रियांचा आवडता विषय. अशाच एका 'शॉपिंग'चा किस्सा.
वनिता,मीना,वैशाली नि आणखी दोन तीन जोडपी सहलीसाठी
जातात.
सहल सात-आठ
दिवसांची असते.
सहलीचा पहिला दिवस, म्हणजे खरेदीचा उत्साह जोरात. त्या
भागातील
प्रसिध्द असलेली
वस्तू खरेदी करण्यावर जास्त भर . रेशीम धाग्यांनी
विणलेली कुशन
कव्हर्स वनिताच्या मनात घर करून बसले.मुक्कामाच्या
प्रत्येक ठिकाणी तिने त्याच्या किमतीची विचारणा
केली . प्रत्येक ठिकाणी
एका कुशन कव्हरची
किंमत ३५० ते ४५० रु. अशीच असते .
पाचव्या दिवशी
एका ठिकाणी तिने
३००रु.ला एक या प्रमाणे कुशन खरेदी केले.
कोणी काय खरेदी केले ? यावर रात्रीच्या वेळी चर्चा झाली. त्यावेळी
सर्वांनाच ते कव्हर्स आवडले .वैशाली नि मीनाने ते कव्हर्स घेण्याचे ठरवले .
परंतु पुढील
कोणत्याही ठिकाणी तशी कव्हर्स दिसली नाहीत .
शेवटच्या मुक्कामी हॉटेलमधील एका
शॉपमध्ये त्यांना ती दिसली.
त्याची किंमत होती, ५०० रु. प्रती नग . 'घेवू कि नको' म्हणून त्या दोघी
विचारात
पडल्या. ती घेण्याची त्यांची जबरदस्त
इच्छा असते. मीना म्हणते,
'अगं ,आपण इथे जर हे कव्हर्स घेतले नाहीत तर आपल्याला ते सारखे आठवत
राहतील. न
घेतल्याची चुटपूट मनाला लागेल. त्याचा विचार करण्यापेक्षा
त्याची खरेदी
केलेलीच चांगली .'चेकआऊट करून विमानतळावर जायचे असते .
त्या दोघी त्या
शॉप मध्ये जातात. जाताना वैशाली म्हणते,'अगं ,पैसे देताना
आमचे हे तर मला
रागातच म्हणाले,आणखी तुझी शॉपिंगच संपली नाही का?
तरी मी त्यांना
त्याची खरी किंमत सांगितलीच नाही. वनिताला सांगावे लागेल
कि, त्याची किंमत ५०० रु. च सांग म्हणून. '
वनिता दिसल्यानंतर वैशाली
तिला म्हणते,'वनिता,मी ते
कव्हर्स घेतले. पण
५०० रु. ला एक पडले. आमच्या यांच्या समोर किमतीचा
विषय काढू नकोस.' वनिता हसते,नि थट्टेत म्हणते,'अगं,मी तुला ४००
रुपयातच दिले
असते. कारण ते मला ३००रुपयालाच पडले .'
यावर वैशाली
म्हणते,'जावू दे ग. हौस भारी
त्याला कोण काय करी!'
अशा प्रकारे ३००
रु. ची वस्तू ५०० रु. ला खरेदी करून शॉपिंगचा
शेवट होतो . 
No comments:
Post a Comment