Friday, June 14, 2013

प्रवास….


कोण?कुठला?माहीत नव्हते…
पहिल्या दिवशी अनोळखी भासले.
हळुहळू ओळख झाली.
अनोळखीशी नाते जुळले.
मैत्रीचे बंध गुंफिले.
काही काळासाठी,
व्याप विसरला .
जगण्याचा अर्थ समजला .
आयुष्यभर …
मन धाव- धाव धावले,
शोध-शोध शोधले,
शोधूनही न मिळाले.
ते सापडले .
हे सारे घडले ,
ते फक्त एका प्रवासामुळे ……
प्रवासातील सोबत्यांसाठी म्हणणे असे ,
'आठवणींच्या एका कप्प्यात ,
ठेव जागा माझ्यासाठी .
डोकावून बघ कधीतरी त्या जागेत .
आठव त्या आठवणींना,
आणि फुलव त्या आनंदी क्षणांना….'