शाळेत सोयीसाठी अ,ब,क… अशी वर्ग विभागणी करत.
यात मित्रमैत्रिणींची पण विभागणी होत असे. शाळेत जाणे-
येणे,मधली सुट्टी या वेळेत त्यांची भेट होत असे. त्यामुळे
सर्व वर्गातील मुलामुलींची ओळख असे. जे सतत सोबत
असत,त्यांना या वर्ग विभागणीमुळे काही फरक पडत
नसे. परंतु या वर्ग विभागणीचा परिणाम मुलांच्या
मनावर नेहमीच राहतो कि काय?असा प्रश्न पडतो.
कारण नुकतीच एक घटना घडली नि या प्रश्नाने
डोके वर काढले.
जवळ जवळ २५ वर्षानंतर,संसाराच्या व्यापातून
प्रत्येकाला फुरसत मिळाली नि शाळेच्या सवंगड्यांची
आठवण झाली . नंतर वर्गमित्रांची शोधाशोध सुरु झाली.
एकाने पुढाकार घेवून ब-याच मित्रमैत्रिणींची यादी तयार
केली. सर्वानुमते 'अ' वर्गाचे गेट-टुगेदर करण्याचे ठरवले.
अ आणि ब वर्गातील ब-याच मुली एकमेकींच्या संपर्कात
असतात. ब वर्गातील शितल ब-याच जणींच्या संपर्कात
असते.शितल कडून अ वर्गातील दोघी-तिघींचा फोन नंबर
घेतला गेला .
पुढे एक दीड महिन्यानंतर त्यांचे गेट टुगेदर झाले.
तिला वाईट वाटले,कि तिच्याकडून फोन नंबर घेवून
तिलाच बोलावलेले नसते. ज्या ठिकाणी गेट टुगेदर
असते. त्याच गावात प्रेरणा राहत असते. तिलादेखील
बोलावलेले नसते. प्रेरणा अ वर्गातील ब-याच जणांच्या
संपर्कात असते. तिला आमंत्रण नसल्यामुळे तिलाही
खूप वाईट वाटते. ती शीतलला फोन करून म्हणते,
'बघ गं,आपल्याला नाही बोलावले. यांच्या मनातून
'अ' ,'ब' वर्ग गेलाच नाही का ?काळ खूप पुढे आलाय.
आज प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रामध्ये चांगले बस्तान
आहे. तरीही हे 'अ','ब' का?'
यात मित्रमैत्रिणींची पण विभागणी होत असे. शाळेत जाणे-
येणे,मधली सुट्टी या वेळेत त्यांची भेट होत असे. त्यामुळे
सर्व वर्गातील मुलामुलींची ओळख असे. जे सतत सोबत
असत,त्यांना या वर्ग विभागणीमुळे काही फरक पडत
नसे. परंतु या वर्ग विभागणीचा परिणाम मुलांच्या
मनावर नेहमीच राहतो कि काय?असा प्रश्न पडतो.
कारण नुकतीच एक घटना घडली नि या प्रश्नाने
डोके वर काढले.
जवळ जवळ २५ वर्षानंतर,संसाराच्या व्यापातून
प्रत्येकाला फुरसत मिळाली नि शाळेच्या सवंगड्यांची
आठवण झाली . नंतर वर्गमित्रांची शोधाशोध सुरु झाली.
एकाने पुढाकार घेवून ब-याच मित्रमैत्रिणींची यादी तयार
केली. सर्वानुमते 'अ' वर्गाचे गेट-टुगेदर करण्याचे ठरवले.
अ आणि ब वर्गातील ब-याच मुली एकमेकींच्या संपर्कात
असतात. ब वर्गातील शितल ब-याच जणींच्या संपर्कात
असते.शितल कडून अ वर्गातील दोघी-तिघींचा फोन नंबर
घेतला गेला .
पुढे एक दीड महिन्यानंतर त्यांचे गेट टुगेदर झाले.
तिला वाईट वाटले,कि तिच्याकडून फोन नंबर घेवून
तिलाच बोलावलेले नसते. ज्या ठिकाणी गेट टुगेदर
असते. त्याच गावात प्रेरणा राहत असते. तिलादेखील
बोलावलेले नसते. प्रेरणा अ वर्गातील ब-याच जणांच्या
संपर्कात असते. तिला आमंत्रण नसल्यामुळे तिलाही
खूप वाईट वाटते. ती शीतलला फोन करून म्हणते,
'बघ गं,आपल्याला नाही बोलावले. यांच्या मनातून
'अ' ,'ब' वर्ग गेलाच नाही का ?काळ खूप पुढे आलाय.
आज प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रामध्ये चांगले बस्तान
आहे. तरीही हे 'अ','ब' का?'