Wednesday, July 30, 2014

aas

एक आसच असते,
ती जगण्याला उभारी देते ……
साथ असते म्हणून अपयश पचते
अपयशच यशाला थारा देते
अंधार असतो म्हणून प्रकाशाला महत्व येते …….
तन असते म्हणून मन असते
मन असते म्हणून भावना येते
एक भावनाच असते,
ती जगण्याचा खेळ खेळते ……
आयुष्य असते म्हणून जगणे असते
आहे तसे ते स्विकारावेच लागते
तेंव्हा ते सकारात्मकतेनेहि जगता येते
म्हणजेच,
एक आसच असते,
ती जगण्याला उभारी देते …… 

No comments:

Post a Comment